पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा विकास म्हणावा असा अद्याप झालेला नाही. आषाढी, कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला मंत्री येतात आणि विकासाची आश्वासने देतात. पंढरपूरच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करणे, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, नमामी चंद्रभागा, परदेशी गुंतवणूकदारांकडून विकास, एमआयडीसी आणि आता नव्याने काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करणार, असे अनेक आश्वासने दिली गेली. मात्र पंढरपूरचा विकास अद्यापही रखडलेलाच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी शुक्रवारी पंढरीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर लाखो भाविक तसेच स्थानिकांच्या फडणवीसांकडून रखडलेले विकास मार्गी लागावा ही माफक अपेक्षा आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीच्या सावळय़ा विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतो. गेल्या काही वर्षांत पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहर आणि मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून येते. आषाढी, कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच एरव्ही दर्शनासाठी आलेले केंद्रातील, राज्यातील मंत्री, विरोधी पक्ष नेते हे कायम भरभरून आश्वासने देतात. लाखो भाविकांची मतपेढी डोळय़ासमोर ठेवून विकासाचे चित्र रंगविले जाते. सत्ता बदलल्यावर नव्याने आश्वासने दिली जातात.
पंढरपूरचा समग्र विकास करण्यासाठी पंढरपूर प्राधिकरणाची स्थापना २००९ साली झाली. यात शहर व परिसराचा विकासांबाबत एक आराखडा तयार केला. तो पुढे लालफितीत अडकला. पुढे तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये शहर, मंदिर परिसर, नदी, घाट, सुशोभीकरण आदींचा समावेश केला. त्यानंतर म्हणजे २०१३ साली संत तुकाराम जन्मचतुश्ताब्दी योजना तयार करण्यात आली. ही योजनासुद्धा रखडली. त्यानंतर सत्तांतर होऊन नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी चंद्रभागा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर झाली. त्याच वर्षी कॅनडा येथील उद्योजक आणि राज्य, केंद्र सरकार यांच्या सहकार्याने ‘स्मार्ट पिलग्रिम’ अंतर्गत कोटय़वधी रुपयांची घोषणा झाली, मात्र हेसुद्धा पूर्ण झाले नाही. नुकतेच राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाबाबत घोषणा केली.
काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करणार यामध्ये शहरातील रस्ते रुंदीकरण, घाट सुशोभीकरण , दर्शन रांग, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावर रुंदीकरण आदी कामांचा समावेश आहे. मात्र या साऱ्या विकासकामाबाबत स्थानिक नागरिकांना ना प्रशासन विश्वासात घेते ना राजकारणी. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापरी, वारकरी गोंधळून गेले आहेत. स्थानिकांचा विकासाला विरोध नाही. मात्र विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर जे अधिकारी आहेत, तेसुद्धा मागील आराखडय़ात थोडा बदल सुचवून कागदे रंगवली जात असल्याचे स्थानिकांचा आरोप आहे. प्रमुख चार यात्रा, दर महिन्याची एकादशी , वर्षांतील सुट्टय़ा या काळात भाविक दर्शनासाठी पंढरीला येता. त्यात प्रमुख यात्रेत म्हणजेच आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला लाखो भाविक येतात. या चार यात्रेत प्रमुख दोन दिवशी पंढरीत लाखो भाविक असतात. एरवी भाविकांची संख्या हजारात असते. त्यामुळे पंढरपूरचा विकास म्हणजे गर्दी नियंत्रण, रस्ता रुंदीकरण, यासह इतर गोष्टींचा विचार प्रशासनाने केला पाहिजे.
वास्तविक पाहता वरील काही योजनेमधून शहरात काही विकास कामे झाली आणि कोटय़वधी रुपये खर्च झाले, मात्र ज्या गतीने विकास होणे गरजेचे होते ते झालेच नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेल्या विकासाला गती द्यावी अशी माफक अपेक्षा लाखो भाविकांसह स्थानिकांची आहे.
यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणासाठी पिढय़ांपिढय़ा पंढरपूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विस्थापित करणे हे चुकीचे आहे. स्थानिक नागरिकांनी याआधी झालेल्या रस्तारुंदीकरण व इतर विकास कामांना कधीच विरोध केलेला नाही. यापूर्वी विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन नीट झालेले नाही. असे असताना हा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यात कुठेही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही. प्रशासनाने जर नागरिकांशी सुसंवाद करून बाधित होणाऱ्या लोकांच्या संपूर्ण पुनर्वसनाच्या संबधी योग्य भूमिका घेतली नाही तर मात्र नागरिकांमधून या आराखडय़ास मोठय़ा प्रमाणावर विरोध होईल.
– अॅड. ओंकार जोशी, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर
शहर
- Pune : रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंंडी, पोलिसांकडून ठेकेदारांविरुद्ध कारवाईचा इशारा
- Pune : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे ध्यान सत्राचे आयोजन
- Pune : समाविष्ट गावांतील बंधारे, तलावांचे पालिकेकडून संरक्षण; अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
महाराष्ट्र
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
- Akola News: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..
- Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग
- Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली
- Pahalgam Terror Attack : मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतला, पुण्यातील दोघांना दहशतवाद्यांनी मारले