Pune : गेल्या काही वर्षांचा विचार करता पुणे विमानतळावरून हवाई प्रवास हे प्रवाशांसाठी एक दिव्य ठरत आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू होऊनही प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र पायाभूत सुविधांचा विस्तार तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यातच विमान कंपन्यांकडून वारंवार विमानांना होणारा विलंब प्रवाशांच्या अडचणींत भर घालणारा ठरत आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये अगदी अपवाद वगळता सर्वांचेच मत नकारात्मक दिसून येते. विमानतळावर प्रवाशांना प्रवास सुसह्य होण्याऐवजी तो असह्य होईल, या पद्धतीने सगळे सुरू आहे. समाजमाध्यमांवर हवाई प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस रोज सुरू आहे. विमान प्रवासात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. प्रवाशांनी वारंवार ओरड करूनही या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडताना दिसत आहे.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कधी सुरू होणार याची चर्चा गेली दोन वर्षे सुरू होती. टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागत नव्हता. उद्घाटनाला मुहूर्त लागल्यानंतर ते सुरू कधी होणार याची प्रतीक्षा होती. उद्घाटनानंतर सहा महिन्यांनी नवीन टर्मिनल सुरू झाले. या कालावधीत पुणेकर हवाई प्रवाशांचे हाल सुरूच होते. आणि आता टर्मिनल सुरू होऊनही हाल सुरूच आहेत. प्रवाशांना नवीन टर्मिनलवरून पायपीट करीत एरोमॉल गाठावा लागत आहे. या एरोमॉलमध्ये पार्किंग असून, ओला आणि उबर तिथूनच घ्याव्या लागतात. नवीन टर्मिनलपासून एरोमॉल दूर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने दोन ई-बस सुरू केल्या आहेत. तरीही प्रवाशांची ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
|
पुणे विमानतळ हे हवाई दलाच्या मालकीचे आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर मर्यादा आहेत. विमानतळाची धावपट्टी सकाळी ८ ते १०.३० या वेळेत बंद असते. या कालावधीत हवाई दलाचा सराव सुरू असतो. काही दिवसांपूर्वी हवाई दलाने धावपट्टी आणखी अर्ध्या तासासाठी ताब्यात घेतल्याने तीन विमाने दुसरीकडे वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. हाच प्रकार विमानांच्या विलंबाचा आहे. काही विमानांना पाच ते सहा तास विलंब होत असून, विमान कंपन्यांकडून विमानतळावर पोहोचल्यानंतर याची माहिती प्रवाशांना दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडून जाण्याबरोबरच त्यांची मोठी गैरसोय होते.
पुण्यातून केवळ दोन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. त्यात वाढ करण्यासाठी पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करावा लागणार आहे. याबाबतचे सर्वेक्षण नुकतेच झाले आहे. धावपट्टीसोबत विमानतळातील पार्किंग बेचाही विस्तार करावा लागणार आहे. हवाई दलाची मालकी आणि विमानतळावरील जागेची मर्यादा लक्षात घेता, हे कितपत शक्य आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे हा गुंता सुटेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे हवाई दलाच्या विमानतळावर विसंबून राहण्याऐवजी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी व्हायला हवी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्याने पुणेकर हवाई प्रवाशांच्या अडचणी सुटतील, अशी आशा प्रवाशांना आहे.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार, असे राज्यकर्ते वारंवार उच्चरवाने सांगत असले, तरी त्यासाठी पावले मात्र उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक चर्चा आणि प्रस्तावाच्या पलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे पुण्यात खरेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याचा भविष्यातील विस्तार आणि उद्योग-व्यवसायांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी सातत्याने केली जात आहे. भविष्यातील पुण्यासाठी आवश्यक असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप हवेतच असल्याचे चित्र आहे. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा लावून धरण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू