
Pune : गेल्या काही वर्षांचा विचार करता पुणे विमानतळावरून हवाई प्रवास हे प्रवाशांसाठी एक दिव्य ठरत आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू होऊनही प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र पायाभूत सुविधांचा विस्तार तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यातच विमान कंपन्यांकडून वारंवार विमानांना होणारा विलंब प्रवाशांच्या अडचणींत भर घालणारा ठरत आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये अगदी अपवाद वगळता सर्वांचेच मत नकारात्मक दिसून येते. विमानतळावर प्रवाशांना प्रवास सुसह्य होण्याऐवजी तो असह्य होईल, या पद्धतीने सगळे सुरू आहे. समाजमाध्यमांवर हवाई प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस रोज सुरू आहे. विमान प्रवासात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. प्रवाशांनी वारंवार ओरड करूनही या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडताना दिसत आहे.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कधी सुरू होणार याची चर्चा गेली दोन वर्षे सुरू होती. टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागत नव्हता. उद्घाटनाला मुहूर्त लागल्यानंतर ते सुरू कधी होणार याची प्रतीक्षा होती. उद्घाटनानंतर सहा महिन्यांनी नवीन टर्मिनल सुरू झाले. या कालावधीत पुणेकर हवाई प्रवाशांचे हाल सुरूच होते. आणि आता टर्मिनल सुरू होऊनही हाल सुरूच आहेत. प्रवाशांना नवीन टर्मिनलवरून पायपीट करीत एरोमॉल गाठावा लागत आहे. या एरोमॉलमध्ये पार्किंग असून, ओला आणि उबर तिथूनच घ्याव्या लागतात. नवीन टर्मिनलपासून एरोमॉल दूर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने दोन ई-बस सुरू केल्या आहेत. तरीही प्रवाशांची ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
|
|
पुणे विमानतळ हे हवाई दलाच्या मालकीचे आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर मर्यादा आहेत. विमानतळाची धावपट्टी सकाळी ८ ते १०.३० या वेळेत बंद असते. या कालावधीत हवाई दलाचा सराव सुरू असतो. काही दिवसांपूर्वी हवाई दलाने धावपट्टी आणखी अर्ध्या तासासाठी ताब्यात घेतल्याने तीन विमाने दुसरीकडे वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. हाच प्रकार विमानांच्या विलंबाचा आहे. काही विमानांना पाच ते सहा तास विलंब होत असून, विमान कंपन्यांकडून विमानतळावर पोहोचल्यानंतर याची माहिती प्रवाशांना दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडून जाण्याबरोबरच त्यांची मोठी गैरसोय होते.
पुण्यातून केवळ दोन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. त्यात वाढ करण्यासाठी पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करावा लागणार आहे. याबाबतचे सर्वेक्षण नुकतेच झाले आहे. धावपट्टीसोबत विमानतळातील पार्किंग बेचाही विस्तार करावा लागणार आहे. हवाई दलाची मालकी आणि विमानतळावरील जागेची मर्यादा लक्षात घेता, हे कितपत शक्य आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे हा गुंता सुटेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे हवाई दलाच्या विमानतळावर विसंबून राहण्याऐवजी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी व्हायला हवी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्याने पुणेकर हवाई प्रवाशांच्या अडचणी सुटतील, अशी आशा प्रवाशांना आहे.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार, असे राज्यकर्ते वारंवार उच्चरवाने सांगत असले, तरी त्यासाठी पावले मात्र उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक चर्चा आणि प्रस्तावाच्या पलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे पुण्यात खरेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याचा भविष्यातील विस्तार आणि उद्योग-व्यवसायांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी सातत्याने केली जात आहे. भविष्यातील पुण्यासाठी आवश्यक असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप हवेतच असल्याचे चित्र आहे. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा लावून धरण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

