Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं आहे. आज उपोषणाचा १४ वा दिवस आहे. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी कालपासून पाणी पिणं आणि औषधं घेणंही बंद केलं आहे. त्यांनी सलाईनही काढलं आहे.
वंशावळी, पडताळणीच्या फेऱ्यात न अडवता ज्यांच्याकडे आज 'मराठा' नोंद आहे, त्यांना थेट 'कुणबी' प्रमाणपत्र द्यावे. हा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही,' अशी भूमिका उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी रविवारी 'सकाळ'शी बोलताना मांडली. राज्य शासनासोबत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर काहीच तोडगा न निघाल्याने जरांगे यांनी कालपासून पाण्याचा त्याग केला असून, उपचार घेणेही बंद केले आहे. दरम्यान, याप्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. एक सप्टेंबरला या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. जरांगे यांना पाठिंबा,आरक्षणाची मागणी व लाठीहल्ल्याच्या निषेधासाठी मराठवाड्याच्या काही भागांत अजूनही आंदोलने होत आहेत. जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेळा चर्चा करून दोन अध्यादेश काढले आहेत.
मात्र, चर्चेच्या फेऱ्या आणि काढलेले अध्यादेश निष्फळ ठरले आहेत. त्यातच आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जरांगे यांनी दिलेला चार दिवसांचा अवधी संपला आहे. त्यामुळे त्यांनी आजपासून पाणी पिणे आणि उपचार घेणे बंद केले आहेत. राज्य शासनाने दोन अध्यादेश काढले. परंतु, ते मान्य नसल्याने परत पाठवले आहेत.
|
वंशावळी, पडताळणीच्या चक्रात न अडकवता ज्यांच्याकडे मराठा नोंदी आहेत, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र राज्य शासनाने द्यावे, यासाठी हा लढा सुरू केला आहे. जोपर्यंत शासन हा निर्णय घेत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.
जरांगे म्हणाले, "मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे, हे खरे आहे. परंतु, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही पूर्वीपासून आपली भूमिका आहे. आरक्षणाचा लढा हा गरीब मराठा समाजासाठी सुरू आहे. गरीब मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी ओबीसी समाजबांधवांचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. त्यांचा विरोध होणार नाही, ते मनपरिर्वतन करून पाठबळ देतील."
आज सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणाचा पेच सुटणार?
मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा तिढा सोडवायचा कसा यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता. ११) सायंकाळी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोंडी फुटणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सर्व प्रमुख पक्षांमध्ये मराठा आणि ओबीसी असे दोन गट असल्याने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याने सरकारची 'इकडे आड तिकडे विहीर' अशी स्थिती झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला होता. २१ जुलै २०२१ रोजी झालेल्या ठरावाचा पाठपुरावा करण्याचे आणि केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले जाईल. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाची तातडीने स्थापना करण्याबाबतही राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे.
राज्य सरकारने मराठवाड्यात सुरू असलेले हे आंदोलन शांत करण्यासाठी लाठीमारापासून सामोपचाराने चर्चेचा मार्गही अवलंबला. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र तातडीने देता यावीत यासाठी माजी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
मात्र त्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम राहिल्याने अखेरीस सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. या बैठकीत हा प्रश्न सोडविण्यासाठी काय करता येईल, यावर साधकबाधक चर्चा होईल. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र द्यावे आणि त्यासाठी वंशावळीचे पुरावे देण्याची अट रद्द करून टाकावी यासाठी मराठवाड्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे
सरकारची कोंडी
मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाजाची नाराजी पत्करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचे दोन अहवाल फेटाळल्यानंतरही कायद्याच्या चौकटीत ही मागणी कशी बसवायची, याचे मोठे कोडे सरकारसमोर आहे
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र दिल्यास पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील मराठा समाजाकडूनदेखील हीच मागणी पुढे येईल
या उपाययोजना करण्याची तयारी
केंद्राने आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथिल करण्यासाठी पाठपुरावा
राज्य सरकार मागासवर्ग आयोगाची स्थापना करणार
कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 'वंशावळ' शब्द काढून टाकता येईल का, याबाबत समितीला अभ्यास करायला सांगणार
.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर