Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार स्थापन होणेआवश्यक आहे; परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते. बहुतेक एक्झिट पोल्सने महायुतीला बहुमत दिले असले, तरी त्यांना किंवा मविआला निर्णायक आघाडी न मिळाल्यास राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता येतो.
विधानसभेच्या निकालानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे. २६ तारखेला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपणार आहे. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे.
कोणत्याही आघाडी वा युतीला निर्णायक बहुमत न मिळाल्यास कायदेतज्ज्ञांच्या मते सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण द्यावे लागेल. हा पक्ष कोणता असेल, त्यावर आगामी राजकारणाची वाटचाल ठरू शकेल, असेही सांगितले जात आहे. पुन्हा एकदा सत्तांतराचा प्रयोग महाराष्ट्रात होतो, की सरकारस्थापनेची प्रक्रिया ठप्प पडते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनीही आज सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राजकीय पक्षांच्या पुढील हालचाली कशा असतील, त्याबद्दल येत्या दोन दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल. विद्यमान व्यवस्थेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही निवडणूकपूर्व आघाड्या असल्यामुळे यातील कोणत्याही बाजूला निर्णायक बहुमत मिळाल्यास परिस्थिती सोपी होईल.
बहुमताचा १४५चा आकडा कोणालाही गाठता न आल्यास मात्र कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या नव्या सदस्यांचे अधिवेशन राज्यपाल बोलावतात; मात्र यासंबंधीचा निर्णय राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर घेतात. त्यासाठी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने म्हणजेच मुख्यमंत्री कोण हे ठरवणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगतात. प्रत्यक्षात दोन दिवसांत मुख्यमंत्री ठरू शकला नाही तर विधानसभेचा कालावधी संपला, हे लक्षात घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती येऊ शकते. विधानसभेचा निकाल कसा लागतो, याकडे राजभवन लक्ष ठेवून आहे.
निकालानंतर चित्र स्पष्ट होईल
याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निवडून आलेल्या सरकार पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण राज्यपाल देतात किंवा राज्यपालांकडे जाऊन बहुमत मिळवलेला पक्ष सरकार स्थापनेचा दावा करतो.
निकालानंतर आकडेवारी समोर आल्यावर कोण मुख्यमंत्री होईल किंवा युती की आघाडी जिंकेल ते स्पष्ट होईल. राज्यपाल यासंदर्भात निर्णय घेऊ शकतील. एखादी आघाडी किंवा युती नव्याने तयार होत असेल तर त्यासाठी घटनेतील शेड्युल दहानुसार निर्णय घ्यावे लागतात. गेल्या काही वर्षात काही राज्यांमध्ये कोणत्या नेत्याने मुख्यमंत्री होण्याचा दावा करायचा, याबद्दल निर्णय न झाल्याने कमी जागा जिंकलेल्या पक्षाचाही मुख्यमंत्री झाला आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा