देशाच्या उत्तर व पूर्व भागात रविवारी धुक्याची दाट चादर पसरली होती. दिल्लीसह मैदानी प्रदेशात सध्या तीव्र थंडीची लाट आली आहे. या भागात किमान तापमान १.९ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. त्यामुळे ४८० रेल्वेगाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या दिवशी दिल्लीतील किमान तापमान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बहुतांश ठिकाणांपेक्षा कमी होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे ३३५ रेल्वेगाडय़ांना विलंब झाला. ८८ रेल्वेफेऱ्या रद्द करण्यात आल्या. ३१ रेल्वेगाडय़ांचा वाहतूक मार्ग बदलण्यात आला, तर ३३ रेल्वेगाडय़ांचा प्रवास त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानाच्या आधीच थांबवण्यात आला.
विमानप्रवाशांना विमान वाहतुकीच्या ताज्या माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सुमारे २५ विमानांच्या उड्डाणास विलंब झाला.भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे भटिंडा व आग्रा येथे दृश्यमानता शून्य मीटर आणि पतियाळा, चंडीगढ, हिस्सार, अलवर, पिलानी, गंगानगर, लखनौ, कूचबिहार आणि अमृतसर, लुधियाणा, अंबाला, भिवानी येथील दृश्यमानता २५ मीटपर्यंत घसरली. पालम (दिल्ली), फुर्सतगंज, वाराणसी, मेरठ, गया आणि धुबरी येथे ५० मीटपर्यंतचे दिसू शकत होते. हरियाणातील रोहतक, दिल्लीतील सफदरजंग, रिज आणि अयानगर, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, बहराइच आणि बरेली, बिहारमधील भागलपूर, पश्चिम बंगालमधील बागडोगरा आणि जलपायगुडी व आसाम, मेघालय त्रिपुरातील अनेक ठिकाणी २०० मीटर दृश्यमानता नोंदवली गेली.
हवामान कार्यालयाच्या माहितीनुसार जेव्हा दृश्यमानता शून्य ते ५० मीटरच्या दरम्यान असते तेव्हा त्या वेळी अतिदाट धुके असते. ५१ ते २०० मीटर दरम्यान दृश्यमानता असल्यास दाट धुके, २०१ ते ५०० मीटर दरम्यान मध्यम व ५०१ ते एक हजार मीटरदरम्यान दृश्यमानता असल्यास विरळ धुके असते.रविवारी सकाळी दिल्लीत थंडीची लाट पसरली होती. दिल्लीतील मुख्य हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेत किमान तापमान १.९ अंश सेल्सियस नोंदवले, जे गेल्या दोन वर्षांतील राष्ट्रीय राजधानीत जानेवारीतील हे सर्वात कमी तापमान आहे.
दिल्लीसह वायव्य भारतातील बर्फाच्छादित पर्वतांवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे लोधी रोड, अयानगर, रिज आणि जाफरपूर हवामान केंद्रांवर अनुक्रमे २.८ , २.६ , २.२ व २.८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील किमान तापमान सलग चौथ्या दिवशी चंबा (८.२), डलहौसी (८.२), धर्मशाला (६.२), सिमला (९.५), हमीरपूर (३.९), मनाली (४.४), कांगडा (७.१), सोलन (३.६), डेहराडून (६), मसूरी (९.६), नैनिताल (६.२), मुक्तेश्वर (६.५) आणि टेहरीसह (७.६) अशा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतेक डोंगराळ प्रदेशांपेक्षा कमी होते. हरियाणाच्या हिस्सारमध्ये १.४, पंजाबच्या आदमपूरमध्ये २.८, चुरूमध्ये उणे ०.५ व राजस्थानच्या पिलानीमध्ये १.५ अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला होता. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ३.२ अंश आणि वाराणसीमध्ये ३.८ , बिहारच्या गयामध्ये २.९ , मध्य प्रदेशातील नौगोंगमध्ये उणे एक अंश आणि उमरियात १.५ अंश सेल्सियस तापमान होते.
थंडीच्या लाटेचे निकष
जेव्हा मैदानी भागात किमान तापमान चार अंश किंवा १० अंश आणि सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश कमी असते, तेव्हा हवामान विभाग थंडीची लाट घोषित करते. किमान तापमान दोन अंशांच्या खाली गेल्यावर तीव्र थंडीची लाट निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. जेव्हा किमान तापमान १० अंशांपेक्षा कमी किंवा तेवढेच असते आणि कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा किमान ४.५ अंश कमी असते तेव्हा थंड दिवस मानला जातो. जेव्हा कमाल तापमान सरासरीपेक्षा किमान ६.५ कमी असते तेव्हा तो अत्यंत थंड दिवस मानला जातो.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं